कर्मयोगी स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांचे कोपरगांव – शिर्डी – राहाता परिसर भारताचा औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील कॅलिफोर्निया व्हावा हे स्वप्न साकारण्यासाठी शिर्डी व सोनेवाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त औद्योगीक वसाहतीत मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित कामगार प्रशिक्षण केंद्राची उभारणी करावी – भाजपच्या प्रदेश सचिव आणि माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे
संपादक - अरुण आहेर

कर्मयोगी स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांचे कोपरगांव – शिर्डी – राहाता परिसर भारताचा औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील कॅलिफोर्निया व्हावा हे स्वप्न साकारण्यासाठी शिर्डी व सोनेवाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त औद्योगीक वसाहतीत मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित कामगार प्रशिक्षण केंद्राची उभारणी करावी – भाजपच्या प्रदेश सचिव आणि माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे
🔥 आग व दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल
कोपरगाव – तालुक्यातील सोनेवाडी – शिर्डी येथे औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत भाजप प्रदेश सचिव आणि माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोपरगांव – शिर्डी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित औद्योगिक वसाहत केंद्रात स्थानिक पातळीवर उच्च दर्जाचे कामगार उपलब्ध करण्यासाठी प्रशिक्षित सेंटर फॉर इव्हेशन, इनोव्हेशन आणि इक्युबेशन अँड ट्रेनिंग सेंटर उभारण्याची विनंती केली आहे.
या निवेदनात सौ. स्नेहलता कोल्हे यांनी
कोपरगाव व राहाता तालुक्यातील हा परिसर सपाट भूप्रदेश असून ब्रिटिश सरकारने या भागाचे महत्व ओळखून औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी दारणा धरण आणि रेल्वेची उभारणी केली. तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या दौऱ्यात या परिसरातील विकास आणि नैसर्गिक विविधता पाहून या परीसराला भारताचा कॅलिफोर्निया म्हणून गौरविले.
संपूर्ण देशाला सर्व दिशांनी जोडणारा मध्यवर्ती भाग असून दुहेरी रेल्वे, सहा राष्ट्रीय महामार्ग, समृध्दी महामार्ग, मुंबई नागपूर द्रुतगती महामार्ग पाच कालवे, देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात लांब व मोठ्या गोदावरी नदीचे लाभक्षेत्र , आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवसरात्र सुविधा देणारे आंतरराष्ट्रीय पातळीवरील, विमानतळ भावी काळात मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन, ऐतिहासिक धार्मिक प्राचीन धार्मिक तिर्थक्षेत्रै, औद्योगिक वसाहती, उच्च. अभियांत्रिकी पदवी – पदविका महाविद्यालये विकासात्मक सुविधांनी गजबजलेला परीसर विमान वाहतूक, रेल्वे , रस्ते व समुद्रमार्गानेअल्प काळात देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात उत्पादित माल तत्काळ कमी खर्चात पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी भाजप मित्रपक्षांच्या केंद्र व राज्य सरकारने पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी व मुख्य मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गत दहा वर्षांतील कारकिर्दीत या परिसरात सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी सोनेवाडी , शिर्डी परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित औद्योगिक वसाहत निर्मितीचे कर्मयोगी आणि माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पोषक वातावरण तयार केल्याने सध्या अनेक नामांकित औद्योगिक कंपन्यांनी येथे गुंतवणूकीस सुरुवात केली आहे. ‘डिफेन्स क्लस्टर’सारखा प्रकल्प राज्य शासनाने मंजूर केला आहे.
भविष्यात येथे रोजगार निर्मितीची नवी दालने खुली होतील. या पार्श्वभूमीवर सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे सादर केलेल्या मागणीमध्ये म्हटले आहे की, या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना स्थानिक पातळीवर कायमस्वरूपी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युवकांना स्किल डेव्हलपमेंटसाठी आवश्यक प्रशिक्षण देणारे इक्युबेशन व ट्रेनिंग सेंटर उभारण्यात यावे यामुळे आर्टिफिशल इंटेलिजन्स (ए. आय.) सारखे आधुनिक प्रशिक्षण मिळून कौशल्य वृद्धी होणार असल्याचा ठाम आत्मविश्वास सौ.स्नेहलता कोल्हे यांनी या पत्रात व्यक्त केला.
तसेच प्रसार माध्यमांशी बोलतांना शिर्डीच्या जवळ विमानतळ, समृद्धी महामार्ग, उच्च दर्जाच्या प्रवास आणि निवास सुविधा आदींच्या सुविधांमुळे येथे देशी-विदेशी उद्योगांना ह्या परिसरात आकर्षित करण्याची क्षमता आहे. या औद्योगिक विकासामुळे केवळ रोजगारच नव्हे तर स्थानिक स्तरावरील व्यवसाय आणि उद्योग वृद्धिंगत होतील.
एमआयडीसीच्या माध्यमातून शिर्डी आणि कोपरगांव परिसरात एक प्रगत, टपस्मार्ट औद्योगिक हब उभे राहण्याची संधी असल्याने कर्मयोगी स्व .शंकरराव कोल्हे आणि कोल्हे परिवारांच्या तीन पिढ्यांच्या त्यागातून भावी काळात ह्या परिसरात होणाऱ्या औद्योगिक आणि कृषी विकासामुळे अल्प कालावधीत जागतिक नकाशावर भारताचा कॅलिफोर्निया म्हणून गौरविला जाणार असल्याची ठाम ग्वाही दिली.
तसेच सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी शिर्डीसाठी व सोनेवाडी परिसरासाठी मांडलेली ही मागणी फक्त स्थानिक विकासाचे नव्हे, तर अहिल्या नगर, नासिक, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जनतेच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरू शकते. गेल्यां चार महिन्यात राज्यात चार केंद्रे मंजूर करण्यात आली आहे त्या धर्तीवर या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा.कोपरगाव तालुक्यातील व शिर्डी परिसराची ओळख नव्या औद्योगिक युगाचे प्रवेशद्वार ठरावे, हीच त्यामागची दूरदृष्टी असल्याने राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. प्राचीन धार्मिक तिर्थक्षेत्रै, औद्योगिक वसाहती, उच्च. अभियांत्रिकी पदवी – पदविका महाविद्यालये विकासात्मक सुविधांनी गजबजलेला परीसर विमान वाहतूक, रेल्वे , रस्ते व समुद्रमार्गानेअल्प काळात देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात उत्पादित माल तत्काळ कमी खर्चात पाठविण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याकरिता भाजप मित्रपक्षांच्या केंद्र व राज्य सरकारने पंतप्रधान नामदार नरेंद्र मोदी व मुख्य मंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गत दहा वर्षांतील कारकिर्दीत या परिसरात सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी सोनेवाडी , शिर्डी परिसरात अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित औद्योगिक वसाहत निर्मितीचे कर्मयोगी आणि माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी पोषक वातावरण तयार केले आहे.सध्या अनेक नामांकित औद्योगिक कंपन्यांनी येथे गुंतवणूकीस सुरुवात केली आहे. ‘डिफेन्स क्लस्टर’सारखा प्रकल्प राज्य शासनाने मंजूर केला आहे.भविष्यात येथे रोजगार निर्मितीची नवी दालने खुली होतील. या पार्श्वभूमीवर सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे सादर केलेल्या मागणीमध्ये म्हटले आहे की, या औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना स्थानिक पातळीवर कायमस्वरूपी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने युवकांना स्किल डेव्हलपमेंटसाठी आवश्यक प्रशिक्षण देणारे इक्युबेशन व ट्रेनिंग सेंटर उभारण्यात यावे यामुळे आर्टिफिशल इंटेलिजन्स (ए. आय.) सारखे आधुनिक प्रशिक्षण मिळून कौशल्य वृद्धी होणार असल्याचा ठाम आत्मविश्वास सौ. स्नेहलता कोल्हे यांनी या पत्रात व्यक्त केला.
तसेच प्रसार माध्यमांशी बोलतांना शिर्डीच्या जवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमानतळ, समृद्धी महामार्ग, उच्च दर्जाच्या प्रवास आणि निवास सुविधा आदींच्या सुविधांमुळे येथे क्लिक देशी-विदेशी उद्योगांना ह्या परिसरात आकर्षित करण्याची क्षमता आहे. या औद्योगिक विकासामुळे केवळ रोजगारच नव्हे तर स्थानिक स्तरावरील व्यवसाय आणि उद्योग वृद्धिंगत होतील. अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित औद्योगिक वसाहत माध्यमातून शिर्डी आणि कोपरगांव परिसरात एक प्रगत, टपस्मार्ट औद्योगिक हब उभे राहण्याची संधी असल्याने भावी काळात हा परिसर होणाऱ्या औद्योगिक आणि कृषी विकासामुळे अल्प कालावधीत जागतिक नकाशावर भारताचा कॅलिफोर्निया म्हणून गौरविला जाणार असल्याची ठाम ग्वाही दिली.
तसेच सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी शिर्डी आणि सोनेवाडीसाठी मांडलेली ही मागणी फक्त स्थानिक विकासाचे नव्हे, तर अहिल्या नगर, नासिक, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील जनतेच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक ठरू शकते. गेल्यां चार महिन्यात राज्यात चार केंद्रे मंजूर करण्यात आली आहे त्या धर्तीवर या मागणीचा सकारात्मक विचार व्हावा.कोपरगाव तालुक्यातील व शिर्डी परिसराची ओळख नव्या औद्योगिक युगाचे प्रवेशद्वार ठरावे, हीच त्यामागची दूरदृष्टी असल्याने राज्य सरकारने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशी अपेक्षा माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.