Breaking
राजकिय

मुळा उजव्या कालव्यातून खरीप हंगामाचे आवर्तन सुटणार – आ. मोनिका राजळे

०१ सप्टेंबर २०२३ रोजी खरीप हंगामाचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

0 0 1 1 6 1

शेवगांव (प्रतिनिधी) :- मुळा उजवा कालव्याच्या लाभक्षेत्रात कमी पाऊस झाल्याने क्षेत्रीय परिस्थितीनुसार व लाभधारक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मुळा धरणातून दिनांक ०१ सप्टेंबर २०२३ रोजी खरीप हंगामाचे आवर्तन सोडण्यात येणार आहे. खरीप हंगामाचे आवर्तन सोडणेबाबत दि. २८ ऑगस्ट २०२३ रोजी मा. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व संबंधीत विभागाची अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानुसार शुक्रवार दि. ०१ सप्टेंबर २०२३ रोजी आवर्तन सोडण्यात येणार आहे. सध्या अत्यंत कमी पाऊस पडल्यामुळे शेतातील पिके करपू लागले असल्याने शेतकऱ्यांनी आवर्तन सोडण्यासाठी मागणी केली होती. सदर आवर्तनाचे टेल टू हेड नियोजन करावे अशा सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आवर्तन काळात अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 1

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे