Breaking
ब्रेकिंग

समता सहकारी पतसंस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ठेवीदारांना महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षितता आणि सर्वौत्कृष्ट सेवाप्रदानातून देशात अव्वल स्थान पटकावले – संचालक संदीप कोयटे,

0 0 1 1 6 5

समता सहकारी पतसंस्थेने अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ठेवीदारांना महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षितता आणि सर्वौत्कृष्ट सेवाप्रदानातून देशात अव्वल स्थान पटकावले – संचालक संदीप कोयटे,

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव : — समता नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थितीचा अहवाल ३१ मार्चला जाहीर करण्याची परंपरा या वर्षी देखील कायम ठेवली असून या आर्थिक वर्षात ३१ मार्चला रविवारची सुट्टी आल्याने ३० मार्चलाच आर्थिक पत्रके जाहीर केली आहे.


अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरामुळे ठेवीदारांना महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षितता प्रदान करणारी समता पतसंस्था अव्वल स्थानावर असल्याचे गौरवोद्गार संचालक संदीप कोयटे, याप्रसंगी बोलताना काढले

सन 2023 – 2024 या आर्थिक वर्षात समताच्या ठेवी ३१ मार्च २०२३ रोजी ७९१ कोटी इतक्या होत्या. त्यात १७* *% इतकी वाढ होऊन ३१ मार्च २०२४ अखेर ९२४* *कोटी रुपयांच्या ठेवी झाल्या आहेत* *तर. ३१ मार्च २०२३ रोजी कर्ज वाटप ५५६ कोटी रुपये होते. ३१ मार्च २०२४ रोजी कर्ज वाटप ६७०* *कोटी रुपये इतके असून त्यात २० % इतकी वाढ झाली आहे. याचे श्रेय समताचे सर्व सभासद* *आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेला आहे.* *आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समता पतसंस्था सभासदांना* *देशातील सर्वाधिक सुरक्षितता प्रदान करणारी संस्था असल्याचा आम्हा संचालक मंडळाला* *अभिमान आहे तसाच अभिमान सभासदांनाही असावा. असे मत संस्थेचे* *संचालक संदीप कोयटे यांनी काढले.


समता नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२३ – २०२४ च्या आर्थिक स्थितीचा अहवाल स्व.मोहनलाल संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, *समता पतसंस्थेची सभासद संख्या ३१ मार्च २०२४ पर्यंत तब्बल ८७,५१९ इतकी झाली* आहे

समता पतसंस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व व्यवहार केवळ १३ शाखांच्या माध्यमातून झालेले आहे. प्रति शाखा ठेवींचा विचार केल्यास प्रति शाखा सरासरी १२२ कोटी रुपये पर्यंत ठेवींचा आकडा जात आहे. हा महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीतील विक्रम आहे. तसेच समता पतसंस्थेने ३१ मार्च २०२४ रोजी १५९४ कोटी रुपयांचा संमिश्र व्यवसाय पूर्ण केला असून सहकार खात्याच्या निकषानुसार वैधानिक तरलतेची गुंतवणूक ही एकूण ठेवीशी २५ % इतकी असावी लागते. म्हणजेच २३१ कोटी गुंतवणूक आवश्यक असताना संस्थेने २७० कोटी इतकी सुरक्षित गुंतवणूक केली आहे.
संस्थेच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणल्यामुळे कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा उच्चांक देखील समता ने केलेला आहे. ३१ मार्च २०२३ रोजी ७९१ कोटी रुपये एवढ्या ठेवी होत्या. ३१ मार्च २०२४ रोजी ९२४ कोटी रुपयांच्या ठेवी झाल्या आहेत. म्हणजेच संमिश्र व्यवसायात २० टक्के वाढ होऊन ५ टक्के कर्मचारी कमी करण्यात यश मिळविले आहे या ठेव वाढीत कर्मचारी संख्या कमी होऊन २४४ झाली आहे. म्हणजेच ठेवीत १७ टक्के वाढ होऊन कर्मचाऱ्यांमध्ये ५ टक्के घट झाली आहे. तसेच २०२० – २१ मध्ये संस्थेच्या ठेवी ६०० कोटी रुपये असताना कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ठेवीमध्ये ५४ टक्के वाढ झाली. परंतु कर्मचारी ५ टक्क्यांनी कमी झाले होते. प्रति कर्मचारी उत्पादक क्षमता ६ कोटी ५३ लाख इतकी आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्मचारी उत्पादकता तब्बल २४ टक्क्यांनी वाढलेली असल्याचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी सांगितले.
समताने ठेव , कर्ज व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापित केले आहे. कर्ज वितरण करताना समता पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणालीचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कर्ज वाटपापैकी अत्यंत सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे. समताचे सोनेतारण कर्ज ३१ मार्च २०२३ अखेर २३८ कोटी रुपये इतके होते, त्यात तब्बल ११४ कोटी रुपयांची वाढ होऊन ते आता ३५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सोने तारण कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या प्रमाणात ५३ % इतके आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक आणि सोनेतारणासारखे अति सुरक्षित कर्ज याचे एकूण ठेवींशी प्रमाण ६८ % इतके आहे. सोने तारण कर्जामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून ०% रिस्क सोनेतारण कर्जात आणण्यात यश मिळविले आहे.
तसेच सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्थात सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतात. त्यामुळे संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी राज्यातीलच नाही तर परराज्यातील ही पतसंस्था मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.


समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्व प्रथम आणून पेपरलेस बँकिंग प्रणाली प्रत्यक्षात आणली आहे. समताने पतसंस्था चळवळ देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.जितुभाई शहा यांनी सांगितले.


या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालक गुलाबचंद अग्रवाल, जितूभाई शहा, अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, रामचंद्र बागरेचा, गुलशन होडे, कांतीलाल जोशी, कचरू मोकळ, निरव रावलिया आदींसह मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत समताच्या ९९.८१ % ठेवीदारांच्या ३५ लाख रुपयांच्या ठेवी सुरक्षित आहे. तसेच उर्वरित २२८ कोटी रुपयांचा ठेवीसाठी २५९ कोटी इतक्या रुपयांचे सुरक्षित कर्ज वाटप केले आहे. – सचिन भट्टड, सरव्यवस्थापक
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे समता पतसंस्था सभासदांना महाराष्ट्रातील सर्वाधिक सुरक्षितता प्रदान करणारी संस्था असल्याचा आम्हा संचालक मंडळाला अभिमान आहे तसाच अभिमान सभासदांनाही असावा. असे मत संस्थेचे संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे यांनी काढले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेची सन २०२३ – २०२४ च्या आर्थिक स्थितीचा अहवाल स्व.मोहनलाल संस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.


ते पुढे म्हणाले की, समता पतसंस्थेची सभासद संख्या ३१ मार्च २०२४ पर्यंत तब्बल ८७,५१९ इतकी झाली आहे. समता पतसंस्थेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व व्यवहार केवळ १३ शाखांच्या माध्यमातून झालेले आहे. प्रति शाखा ठेवींचा विचार केल्यास प्रति शाखा सरासरी १२२ कोटी रुपये पर्यंत ठेवींचा आकडा जात आहे. हा महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्था चळवळीतील विक्रम आहे. तसेच *समता पतसंस्थेने ३१ मार्च २०२४ रोजी १५९४ कोटी रुपयांचा* *संमिश्र व्यवसाय पूर्ण केला* *असून सहकार खात्याच्या निकषानुसार वैधानिक तरलतेची* *गुंतवणूक ही एकूण ठेवीशी २५ % इतकी असावी लागते*
*२३१ कोटी गुंतवणूक आवश्यक* *असताना संस्थेने २७० कोटी इतकी सुरक्षित गुंतवणूक* *केली आहे.*
संस्थेच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणल्यामुळे कमीत कमी कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा उच्चांक देखील समता ने केलेला आहे.
३१ मार्च २०२३ रोजी ७९१ कोटी रुपये एवढ्या ठेवी होत्या. ३१ मार्च २०२४ रोजी ९२४ कोटी* *रुपयांच्या ठेवी झाल्या आहेत* . म्हणजेच संमिश्र. व्यवसायात २० टक्के वाढ होऊन ५ टक्के कर्मचारी कमी करण्यात यश मिळविले आहे या ठेव वाढीत कर्मचारी संख्या कमी होऊन २४४ झाली आहे. म्हणजेच ठेवीत १७ टक्के वाढ होऊन कर्मचाऱ्यांमध्ये ५ टक्के घट झाली आहे. तसेच २०२० – २१ मध्ये संस्थेच्या ठेवी ६०० कोटी रुपये असताना कर्मचाऱ्यांच्या तुलनेत ठेवीमध्ये ५४ टक्के वाढ झाली. परंतु कर्मचारी ५ टक्क्यांनी कमी झाले होते. प्रति कर्मचारी उत्पादक क्षमता ६ कोटी ५३ लाख इतकी आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्मचारी उत्पादकता तब्बल २४ टक्क्यांनी वाढलेली असल्याचे सरव्यवस्थापक सचिन भट्टड यांनी सांगितले.
समताने ठेव , कर्ज व गुंतवणूक यामध्ये विविध विक्रम प्रस्थापित केले आहे. कर्ज वितरण करताना समता पतसंस्था महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने विकसित केलेली सिबिल सारखी क्रास प्रणालीचा वापर केल्याशिवाय कर्ज पुरवठा करत नाही. विशेषतः बँकिंग क्षेत्रातील कर्ज वाटपापैकी अत्यंत सुरक्षित समजले जाणारे सोनेतारण कर्ज हे जगात सर्वात सुरक्षित समजले जाणारे कर्ज आहे. समताचे सोनेतारण कर्ज ३१ मार्च २०२३ अखेर २३८ कोटी रुपये इतके होते, त्यात तब्बल ११४ कोटी रुपयांची वाढ होऊन ते आता ३५२ कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. सोने तारण कर्जाचे प्रमाण एकूण कर्जाच्या प्रमाणात ५३ % इतके आहे. संस्थेची सुरक्षित गुंतवणूक आणि सोनेतारणासारखे अति सुरक्षित कर्ज याचे एकूण ठेवींशी प्रमाण ६८ % इतके आहे. सोने तारण कर्जामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करून ०% रिस्क सोनेतारण कर्जात आणण्यात यश मिळविले आहे.
तसेच सोनेतारण कर्ज वितरण सुरक्षित होण्यासाठी देखील विविध अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केल्याने महाराष्ट्रातील पतसंस्थात सोने तारण कर्ज वाटपात समताचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत असतात. त्यामुळे संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी राज्यातीलच नाही देशातील ही पतसंस्था मोठ्या प्रमाणात भेट देत असतात.
समताने अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीमध्ये देखील केवळ समता पतसंस्थामध्ये नव्हे, तर बँकिंग क्षेत्रामध्ये क्रांती केलेली आहे. मोबाईल बँकिंग, ऑनलाइन बँकिंग, त्याचबरोबर व्हाऊचरलेस बँकिंग प्रणाली पतसंस्था चळवळीमध्ये सर्व प्रथम आणून पेपरलेस बँकिंग प्रणाली प्रत्यक्षात आणली आहे. समताने पतसंस्था चळवळ देखील बँकांपेक्षा कमी नाही हे दाखवुन दिल्याचे संस्थेचे जेष्ठ संचालक श्री.जितुभाई शहा यांनी सांगितले.
या वेळी समता पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, व्हा.चेअरमन सौ.श्वेता अजमेरे, संचालक गुलाबचंद अग्रवाल, जितूभाई शहा, अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, रामचंद्र बागरेचा, गुलशन होडे, कांतीलाल जोशी, कचरू मोकळ, निरव रावलिया आदींसह मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते .

*समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन स्कीम अंतर्गत समताच्या ९९.८१* *% ठेवीदारांच्या ३५ लाख रुपयांच्या ठेवी सुरक्षित आहे. तसेच* *उर्वरित २२८ कोटी रुपयांचा ठेवीसाठी २५९ कोटी इतक्या रुपयांचे सुरक्षित* *कर्ज वाटप केले आहे. – सचिन भट्टड, सरव्यवस्थापक

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 1 6 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे