Breaking
देश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

कर्मयोगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांनी गेल्या सत्तर वर्षात अहोरात्र सर्वस्व पणाला लावून शेतीपूरक व्यवसायांसाठी सर्वं प्रकारची सढळ मदत करुन हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या – भाजप युवानेते विवेक कोल्हे

कार्यकारी संपादक प्रा.पोपट साळवे

0 0 4 0 6 3

कर्मयोगी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब यांनी गेल्या सत्तर वर्षात अहोरात्र सर्वस्व पणाला लावून शेतीपूरक व्यवसायांसाठी सर्वं प्रकारची सढळ मदत करुन हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखल्या – भाजप युवानेते विवेक कोल्हे

🔥 आग आणि दैनिक गणेश श्रध्दा न्यूज पोर्टल

कोपरगाव – शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत पुरक व्यवसायाकडे वळावे. शेतीपूरक उपक्रम सुरू करून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण.करतांना कोणत्या उपक्रमांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण बळकटीकरणाच्या माध्यमातून अल्प खर्च , अल्प कालावधी, कमीत कमी मनुष्यबळात, अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित प्रणालीच्या वापरातून प्रत्येक घरात एक उद्योजक जन्माला येऊन स्वतः कुटुंबासह आपल्या परिसरातील रिकाम्या हातांना कामाला जुंपण्याकरितातसेच सामान्य जनांच्या जटील समस्या संपविण्यासाठी सहकारी चळवळीच्या माध्यमातून एक मजबूत संघटन उभारून जगाच्या नकाशावर आपल्या परिसराला किमान महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून झळकवण्यासाठी कर्मयोगी व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबव कोल्हे कुटुंबियांच्या तीन पिढ्यांनी यांनी गत ७० वर्षात अहोरात्र आपले सर्वस्व पणाला लावून अनेक शेतीपूरक उद्योगासह शैक्षणिक सुविधा निर्मिती घडविल्याने भारतात दरवर्षी लाखांवर विक्रमी आत्महत्या होत असल्याचे काळात कायमस्वरूपी दुष्काळी कोपरगांव तालुका परिसर अपवाद ठरवून हजारो शेतकरी आत्महत्या रोखल्या असे गौरवोद्गार सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी काढले.

कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी भक्तनिवास क्रमांक दोन येथे संजीवनी उद्योग समूह आणि संजीवनी फार्मर्स फोरम यांच्या सहकार्याने आयोजित शेतीपूरक व्यवसायातील संधी शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. प्रतिमा पूजन मा.आ.स्नेहलताताई कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे आणि मत्स्य संस्थेचे उपाध्यक्ष अंबादास पाटोळे आणि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहोम यांच्या हस्ते करण्यात आले.

बँक ऑफ इंडियाचे प्रतिनिधी नितीन ढसाळ, संदीप खेमनर आणि अविनाश जाधव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी संजीवनी ग्रुप हेड न्यू व्हेंचर्स संजीव पवार यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, “संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि चेअरमन युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी शेतकऱ्यांची आर्थिक क्रयशक्ती वाढवण्यासाठी विविध शेतीपूरक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुढाकार घेण्याचा सल्ला दिला.

माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, कर्मयोगी “स्व. शंकरराव कोल्हे यांनी भविष्यातील धोके ओळखून, आपल्या परिसरात निम्म्या लोकसंख्येच्या बेरोजगार असलेल्या ग्रामीण महिलांना शेती जोडधंदा मिळवून देण्यासाठी सहकारी बचत गटाच्या चळवळीची जबाबदारी माझ्यावर सोपवून माझ्याकडून एक ऐतिहासिक कामगिरी घडविली. महिलांसाठी बचतगटांच्या माध्यमातून आर्थिक शिस्तीचा पाया घातला आणि त्यांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी विविध दिशा दाखवल्या.याचमुळे ग्रामीण भागातील महिलांची स्वतःची सर्व अत्याधुनिक सुविधा असलेली पक्की घरे, मुला-मुलींची उच्च शिक्षणासह स्वतंत्र यशस्वी उद्योग निर्मिती घडल्या मुळे हा परिसर कर्जबाजारी कुटुंब प्रमुख आत्महत्या कल़ंकापासून आजपर्यंत मुक्त राहिला आहे. भावी काळातही महिलांनी बचतगटांबरोबरच शेतीपूरक व्यवसायातही योगदान दिल्यास त्या उत्तम पध्दतीने आर्थिक प्रगती साध्य करू शकतात ही काळ्या दगडावरची सफेद रेष असल्याने महिलांनी आपल्या कुटुंबाप्रमुखाच्या खांद्याला खांदा लावून जटील समस्या विरोधात खंबीरपणे संघर्ष करावा असे कळकळीचे आवाहन केले”

विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले की, “संजीवनी फार्मर्स फोरममार्फत शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसायाचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, विपणन आणि सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जात आहेत यावर मार्गदर्शन करताना मत्स्य शेती,केशर, मशरूम, कोरफड, रेशीम, बांबू शेती असे विविध पुरक व्यवसाय यासारखे पर्याय उपलब्धीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

मेळाव्याच्या शेवटी कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष केशवराव भवर व इतर शेतकऱ्यांनी शेतीपूरक उद्योगांबाबत प्रश्न उपस्थित केले. त्याचे अभ्यासपूर्ण उत्तर विवेकभैय्या कोल्हे यांनी दिले. आभार बाजार समितीचे सभापती साहेबराव रोहम यांनी मानले.

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 6 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे